खासदार राहूलजी गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कार्यवाही; काँग्रेस पक्ष लढाई लढणार: आमदार अमित देशमुख...
- MahaLive News
- Apr 1, 2023
- 2 min read

लातूर- देशात सध्या सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करण्यात येत आहे. जगभरातून या संदर्भाने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, भारताच्या लौकिकाला त्यामुळे हानी पोहोचत आहे.
देशाना लौकीक कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात लढा उभारणार असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार कडून होत असलेल्या कारवाइचा निषेध करून देशात निर्माण झालेल्या अराजकतेची माहिती देण्यासाठी शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होत.
या पत्रकार परीषदेस पक्षप्रतिनिधी आमदार राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना ते सोडवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, मात्र जनतेचा आवाज बनवून प्रश्न विचारणाऱ्या खा. राहुल जी गांधी यांच्यावर अत्यंत गतिमान पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या परिस्थितीत काँग्रेस पक्ष केंद्रातील अत्याचारी, जुलमी सत्तेला घाबरणार नाही, लोकशाही मूल्य जोपासणाऱ्या इतर सर्व राजकीय पक्ष व जनतेला सोबत घेऊन लोकशाही, संविधान व देश वाचवण्यासाठी लढाई लढून ती जिंकेल असा विश्वास आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलतांना काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी अदानी घोटाळया संदर्भात प्रश्न विचारले. अदानी उदयोग समूहातील सेल कंपन्यात गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे आहेत? यात चिनी नागरीकांचा सहभाग आहे का? गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा सबंध काय आहे. पदेश दौऱ्यात पंतप्रधना सोबत गौतम अदानी कोणत्या अधिकारात गेले ? हे प्रश्न सरकारला हादरवून सोडणारे होत. या प्रश्नाची उत्तरे देऊ लागू नये म्हणून खासदार राहूल गांधी यांनाच संसदेतून बडतर्फ करण्याची खेळी केंद्रसरकारने केली आहे. खासदार राहूल गांधीचे हे प्रश्न देशातील जनतेचे प्रश्न आहेत. त्यामूळे काँग्रेस पक्ष आता जनतेला सोबत घेऊन सरकारला हे प्रश्न विचारणार असल्याचे आमदार राठोड यांनी म्हटले आहे.
#MahaliveNews #LaturNews #LaturUpdate #राहूलगांधी #काँग्रेस #अमितदेशमुख #BreakingNews
Comments