राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत वाय-फाय कनेक्शन...
- MahaLive News
- Aug 30, 2021
- 1 min read

लातूर- महाराष्ट्र सरकार ने राज्यातील दुर्गम गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची योजना सुरु केली आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात दुर्गम भागातील एक गाव नागतीर्थवाडी हे मोफत वाय-फाय कनेक्शनचे पहिले असे गाव बनले, जिथे फ्री नेटवर्किंग सुविधा प्रदान केली आहे. बीडीओ मनोज राऊत यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, मोफत इंटरनेट देतेवेळी अनावश्यक साईट ब्लॉक केल्या जातील. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, जे लॉकडाऊनच्या दरम्यान ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात होते. आता ते शाळांमधून ऑनलाइन वर्गात सहभागी होण्याच्या आशेवर आहेत. राऊत म्हणाले, हा उपक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या द्वारे प्रस्तावित 'सुंदर माझा गाव' कार्यक्रमाचा भाग आहे आणि जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांचा बीएएलए उपक्रम आहे, ज्याचा उद्देश गावांना एक स्मार्ट मॉडलच्या रूपात विकसित करण्याचा आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments