राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंचांची थेट जनतेतून निवड...
- MahaLive News
- Aug 12, 2022
- 1 min read

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येणार असून शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबरला होणार आहे तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे -
नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५.
धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- २.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- १, संग्रामपूर- १, नांदुरा- १, चिखली- ३ व लोणार- २.
अकोला: अकोट- ७ व बाळापूर- १. वाशीम: कारंजा- ४.
अमरावती: धारणी- १, तिवसा- ४, अमरावती- १ व चांदुर रेल्वे- १.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५ व देगलूर- १.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- ६.
परभणी: जिंतूर- १ व पालम- ४. नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७.
पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.
अहमदनगर: अकोले- ४५.
लातूर: अहमदपूर- १.
सातारा: वाई- १ व सातारा- ८. व
कोल्हापूर: कागल- १.
एकूण: ६०८
Comments